तांत्रिक बिघाडामुळे साखर कारखाना बंद, झाली वाहतुकीची कोंडी

शामली : तांत्रिक बिघाडामुळे शामली साखर कारखाना दोन तास बंद होता. यामुळे शहरात संध्याकाळी ऊस वाहतुक करणार्‍या गाड्यांमुळे ट्रॅफीक जाम झाले होते. यामुळे पायी प्रवास करणार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. बुधवारी शामली साखर कारखान्यात दुपारनंतर अचानक तांत्रिक बिघाड आला. ज्यामुळे जवळपास दोन तास कारखाना बंद होता. दुपारी 2 पासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत शामली कारखाना बंद पडल्यामुळे कारखान्याच्या रोडपासून अग्रसेन पार्क, हनुमान रोड, नाना पूल, सुभाष चौकापर्यंत ऊसाच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. ज्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले. शहरात यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. रेल्वे स्टेशनला जाणार्‍या प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.

शामली साखर कारखान्याचे ऊस उपमहाव्यवस्थापक नरेश कुमार यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत शामली साखर तांत्रिक बिघाडामुळे बंद होता. या दरम्यान, ऊसाच्या गाड्या थांबल्यामुळे ट्रॅफीक जाम झाला. रात्रीपर्यंत जाम संपेल

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here