नोव्हेंबर मध्ये सुरु करावा साखर कारखान्याचा गाळप हंगाम, शेतकऱ्यांची मागणी

किच्छा, उत्तरांचल: शेतकर्‍यांनी साखर कारखान्याचा गाळप हंगाम नाव्हेंबर मध्ये सुरु करण्याची मागणी केली. त्यांनी कार्यकारी अधिकारी रुचि मोहन रयाल यांना निवेदन देवून कारखान्यातील दुरुस्ती वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

गुरुवारी दुपारी शेतकर्‍यांनी माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नारायण सिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी रुचि मोहन रयाल यांची भेट घेतली. त्यांनी ईडी ला निवेदन देवून सांगितले की, साखर कारखाना क्षेत्रामध्ये 90 टक्क्याच्या आसपास ऊस सुधारित जातीचा आहे. जो तोडण्यासाठी पूर्ण पणे तयार आहे. ऊसाचे पीक कापल्यानंतर शेतकर्‍यांना पुढच्या पीकासाठी शेत तयार करावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना वेळेवर न चालू झाल्याने गव्हाचे पीक प्रभावित झाले आहे. ज्यामुळे क्षेत्रातील शेतकर्‍यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतकर्‍यांनी इशारा देवून सांगितले की, साखर कारखान्याचा गाळप हंगाम वेळेत सुरु झाला नाही तर त्यांना नाइलाजाने आंदोलन करावे लागेल. यावेळी अरुण तनेजा, बंटी पपनेजा, कृष्ण कुमार सिंह, महेंद्र सिंह, केवल सिंह, अभिषेक शुक्ला, बंटी सिधी, प्रेम आर्य, कैलाश जोशी, विशन सिंह काेरगा, किशन सिंह, हरीश बिष्ट, मोहन सिंह बिष्ट आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here