साखर कारखाना कर्मचार्‍यांची निदर्शने, चार महिन्यांपासून पगार प्रलंबित

पूरनपूर: चार महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी कारखान्याबाहेर निदर्शने केली. कर्मचार्‍यांनी जीएम यांना भेटून थकबाकी लवकरात लवकर देण्याची मागणी केली.

दि किसान सहकारी साखर कारखान्यामध्ये स्थायी, संविदा, डेलीवेज, मस्टरोल वर ठेवलेल्या कर्मचार्‍यांना चार महिन्यापासून पगार मिळालेला नाही. कर्मचार्‍यांनी अनेकवेळा अधिकार्‍यांची भेट घेतली आहे. ईद, रक्षाबंधन अशा सणाच्या दिवशी देखील पगार न दिल्याने कारखान्याच्या बाहेर कर्मचार्‍यांनी गोंधळ घातला. त्यांचे म्हणणे होते की, पगार न मिळाल्याने ते आर्थिक संकटात आहेत. तर निर्यात, महीन्याचा कोटा आणि ब्राउन शुगर च्या विक्रीनंतर ही त्यांना पगार दिला नाही. साखर कारखाना जीएम वीपी पांड्ये यांचे म्हणणे होते की, आता व्यवस्थापनाकडे पैसे नाहीत. पण साखर विक्री झाल्यावर लगेचच पैसे भागवण्याचा प्रयत्न केला जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here