आगामी गाळप हंगाम वेळेत सुरू होण्यासाठी साखर कारखान्यांना दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले

पीलीभीत : उत्तर प्रदेशातील ऊस विभागाने साखर कारखान्यांना लवकरात लवकर सर्व थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच जे कारखाने थकबाकी भागवण्यात अपयशी ठरतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

साखर उद्योग आणि ऊस विकास चे प्रमुख सचिव भूसरेड्डी यांच्या नुसार, साखर कारखान्यांनी हंगामी दु़रुस्ती आणि देखभाली चे काम पूर्ण करावित असेही सांगण्यात आले आहे, जेणेकरुन आगामी गाळप हंगाम वेळेवर सुरु होवू शकेल. 2020-21 च्या हंगामात उत्तर प्रदेशामध्ये साखर उत्पादन जवळपास 123.06 लाख टन होण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांच्या प्रलंबित ऊस थकबाकी बाबत विरोधी पक्षाकडून होणाऱ्या टीके दरम्यान , उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी ऊस शेतकर्‍यांना 45 दिवसांच्या लॉकडाउन च्या दरम्यान 6,000 करोड रुपये दिले असल्याचा दावा केला आहे . ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, लॉकडाउन दरम्यान साखरेची विक्री कमी होवूनही कारखान्यांकडून शेतकर्‍यांची थकबाकी भागवण्यात आली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here