साखर कारखान्यांनी थकीत ऊस बिले देण्याची मागणी

शामली : किसान युनीयनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी सवित मलिक यांनी कोरोनाच्या संकाटाच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने कारखान्यांनी ऊसाचे पैसे द्यावेत अशी मागणी केली आहे.

शेतकरी युनीयनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी सवित मलिक यांनी सांगितले की, कोरोनाच्या संक्रमण काळात देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी अर्थव्यवस्थेसाठी योगदान देत आहेत. मात्र, सरकारने एकदाच रासायनिक खतांचे दर वाढवले आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने त्यांची स्थिती बिकट आहे. डीएपीचा दर १२०० रुपयांवरून वाढवून १९०० रुपये करण्यात आला आहे. उसाच्या दरात गेल्या चार वर्षात काहीच वाढ झालेली नाही. गव्हाच्या दरात ५० रुपये वाढ करण्यात आली. तर डीएमपीचा दर ७०० रुपयांनी वाढला आहे. पेट्रोल, डिझेलही महागले आहे. वीज महागल्याने शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला आहे. सरकारने ऊस बिले तातडीने द्यावीत, खते आणि कीटकनाशकांचे दर कमी करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here