महाराष्ट्रामध्ये ऊस थकबाकी भागवण्यात गती

पुणे: ऊस थकबाकी भागवण्याची स्थिती महाराष्ट्रामध्ये चांगली आहे. महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांनी 2019-20 च्या गाळप हंगामातील शेतकर्‍यांना 99 टक्के एफआरपीचे पैसे दिले आहेत. कारखान्यांनी शेतकर्‍यांना आतापर्यंत 13,759 करोड रुपयांच्या एफआरपीचे पैसे भागवले आहेत. तर या हंगामात आता केवळ 132 करोड रुपये देय आहेत. अर्थात या हंगामात केवळ 1 टक्के ऊस थकबाकी भागवणे बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस थकबाकी गतीने भागवली जात आहे.
2020-21 हंगामात महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र 2019-20 हंगामाच्या तुलनेमध्ये जवळपास 43 टक्के वाढले आहे. 2019 मध्ये काहीभागात कमी पाऊस आणि दुसरीकडे पूरामुळे ऊस क्षेत्र आणि उत्पादनात मोठी घट दिसून आली. 2019-20 च्या हंगामाच्या 7.76 लाख हेक्टरच्या तुलनेत 2020-21 मध्ये क्षेत्र 11.12 लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. साखरेचे उत्पादन 2020-21 हंगामामध्ये जवळपास 101.34 लाख टन होण्याचा अंदाज आहे, तर 2019-20 मध्ये 61.61 लाख टनाचे उत्पादन झाले, जे मागील हंगामाच्या जवळपास 39.73 लाख टन कमी होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here