उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील साखर कारखाने २० ऑक्टोबरला सुरू होणार

मुरादाबाद : ज्या जिल्ह्यांमध्ये उसाचे अधिक उत्पादन होते, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऊस तथा साखर उद्योगाचे राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी बैठक घेतली.

भुसरेड्डी यांनी सांगितले की, पश्चिम उत्तर प्रदेशातील साखर कारखाने २० ऑक्टोबरपासून सुरू केले जातील. जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांचे वेळेवर पाहणी करून आढावा घ्यावा. उसाची थकीत बिले देण्यास शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे ज्या कारखान्यांना गाळप सुरू करायचे आहे, त्यांनी सर्व ऊस बिले अदा करायला हवीत. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकारी साखर कारखान्यांचे प्रशासक असल्याने त्यांनी कारखान्यांचे आर्थिक व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करावे. सध्याच्या हंगामातील कारखान्यांसाठी मशीनरीची दुरुस्ती, देखभालीसाठी ठराविक निधीचा वापर करावा.

जिल्हा ऊस अधिकारी अजय सिंह यांनी सांगितले की, मुरादाबाद येथील रानी नांगल, अगवानपूर, बिलारी यांसह चारही साखर कारखान्यांची देखभाल करण्यात आली आहे. कारखाना प्रशासनाशी लवकर सुरू करण्याबाबत चर्चा दिली आहे. शासनाने ठरवलेल्या तारखेला कारखाने सुरू केले जातील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here