साखर कारखान्यांनी केले शंभर टक्के ऊस बिल अदा

आंबेडकरनगर : अयोध्या परिक्षेत्रातील सर्व साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसापोटी सर्व पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केले आहेत.

अप्पर मुख्य सचिवांनी सर्व संबंधित साखर कारखान्यांना त्वरीत ऊस बिले द्यावीत असे निर्देश दिले होते. उप ऊस आयुक्त हरपाल सिंह यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२१-२२ च्या ऊसाच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. गाववार उसाच्या नोंदींबाबतची माहिती प्रदर्शनांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. उपलब्ध माहितीमध्ये बदल करणे, त्यातील नोंदी अद्ययावत करून चुका टाळण्याचे काम सुरू आहे.

जिल्हा ऊस अधिकारी डॉ. हरिकृष्ण गुप्ता यांनी सांगितले की, जर आकडेवारीत काही बदल असतील तर ऊस विकास समित्या, ऊस परिषद, ऊस पर्यवेक्षकांसह नियुक्त करण्यात आलेल्या कृषी समन्वयकांकडून या त्रुटींचे निराकरण करण्यात येईल. याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here