नव्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांची सज्जता

बदायूं : आगामी २०२१-२२ या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. सध्या कारखान्यांमध्ये देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. शेखूपुर कारखान्याने दुरुस्तीचे २५ टक्के काम पूर्ण केले आहे. बिसौली कारखान्यातही काम गतीने सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात कारखाने उसाचे गाळप सुरू करतील.

जिल्ह्यात दोन साखर कारखाने आहेत. दी किसान सहकारी साखर कारखाना शेखूपुर आणि बिसौली येथील युद साखर कारखाना या दोन्हींमध्ये दुरुस्तीची कामे सुरू आहेत. गेल्या हंगामात जी यंत्रसामुग्री खराब झाली, ती आता बदलली जात आहे.

कारखान्यांमधील मिल हाउस, पॉवर हाउस, बॉयलर, टर्बाईन यातील दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामध्ये गरजेनुसार यंत्रांचे पार्ट बदलले गेले आहेत. ऊसाच्या गाळपावेळी मशीनरीची शिल्लक राहिलेली सफाई केली जात आहे. जिल्हा ऊस अधिकारी रामकिशन यांनी सांगितले की, शेखूपुर येथील किसान सहकारी साखर कारखाना आणि बिसौलीच्या यदू साखर कारखान्यात दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शेखूपुर कारखान्यातील काम २५ टक्के पूर्ण झाले आहे. तर बिसौलीत आता उर्वरीत कामे करण्यात येत आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here