मजुरांना घरी पाठवण्याची जबाबदारी साखर कारखाने घेणार

बिजनौर : जिल्ह्यातील साखर कारखान्यातील कामगारांना साखर कारखाने त्यांच्या घरी पाठवणार. यासाठी बस किंवा इतर व्यवस्था साखर कारखान्यांनाच करावी लागणार आहे. जिल्हा ऊस अधिकारी यांनी या संदर्भात साखर कारखान्यांना निर्देश दिले आहेत. जर कुठल्या साखर कारखान्याने मजुरांकडे दुर्लक्ष केले तर त्या विरोधात कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये आजूनही ऊस गाळप सुरु आहे. गाळप आता शेवटच्या टप्प्यात आहे. एक दोन दिवसात साखर कारखान्यातील गाळप थांबेल . साखर कारखान्यांमध्ये पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार येथील अनेक मजुर काम करत आहेत. कारखान्यांमध्ये काम करणार्‍या मजुरांना त्यांच्या जिल्ह्यात पोचवण्याची जबाबदारी साखर कारखान्यांची असेल. जर कुठला कारखान्याने बंद झाल्यानंतर मजुरांना कामावरुन काढले तर त्या विरोधात कारवाई केली जाईल. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या अनुसार साखर कारखान्यांना तिथे काम करणार्‍या मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here