महाराष्ट्रातील साखर उत्पादन १०५ लाख टनावर

पुणे : महाराष्ट्रातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत, २२ एप्रिल २०२१ अखेर १५६ साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२१ अखेर १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला. राज्यात १००२.८१ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५०.९१ लाख क्विंटल (१०५.०९ लाख टन) साखर उत्पादन केले झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ४३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३७ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. नांदेड विभागातील २३ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. पुणे विभागातील २५ कारखाने बंद झाले असून अहमदनगर विभागातील १४ कारखाने बंद झाले आहेत. तर औरंगाबाद विभागातील १०, अमरावती विभागातील २ कारखान्यांचे गाळप संपले आहे. नागपूर विभागातील २ कारखाने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here