महाराष्ट्रात साखर उत्पादन १०६ लाख टनावर, अद्याप तीन कारखाने सुरू

पुणे : महाराष्ट्रातील गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत, २० मे २०२१ अखेर १८७ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर तीन कारखाने अद्याप सुरू आहेत.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २० मे २०२१ अखेर राज्यात १९० कारखान्यांनी गळीत हंगामात भाग घेतला. राज्यात १०१२.२९ लाख टन उसाचे गाळप होऊन १०६२.५६ लाख क्विंटल (१०६.२५ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.५० टक्के आहे.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ४३ कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३७ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. नांदेड विभागातील २६ कारखाने बंद झाले. पुणे विभागातील ३१ कारखाने बंद करण्यात आले असून अहमदनगर विभागातील २५ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. तर औरंगाबादमधील २०, अमरावतीमधील २ कारखाने बंद झाले आहेत. नागपूर विभागातील ३ कारखान्यांचे गाळपही पूर्ण झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here