पुढच्या हंगामात देशात साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज

पुणे: हवामानतील बदलामुळे चालू हंगामात साखरेच्या उत्पादनात घट होवू शकते, पण जाणकारांच्या मते येणार्‍या हंगामात चांगल्या पावसामुळे साखरेचे उत्पादन चांगले होईल.

पावसाचे हवामान भारताच्या येणार्‍या शेवटच्या ऊस उत्पादनाचा आकार निश्‍चित करेल. पण सध्या उद्योगातील जाणकारांच्या मते भारतात 2020-21 च्या हंगामात जवळपास 300 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे, तर 2019-2020 च्या हंगामात 260 लाख टन उत्पादनाची आशा आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये साखरेच्या अतिरिक्त साठ्यामुळे केंद्र सरकारने साखर उद्योगाला अतिरिक्त साखर साठे कमी होण्यात मदत करण्यासाठी अनेकदा प्रोत्साहन दिले आहे. चालू साखर हंगामात, थाईलंड बरोबरच भारताच्या साखर उत्पादनात घट झाल्याने जागतिक किमती वाढण्यासाठी मदत झाली आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) चे अध्यक्ष विवेक पिट्टी यांनी सांगितले की, यावर्षी चांगल्या पवासामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये पुढच्या वर्षी ऊसाचे क्षेत्रफळ वाढेल. जागतिक साखर संघटनेने 2020-2021 च्या हंगामात भारतात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here