कोल्हापूर विभागात साखर रिकवरी 12 च्या पुढे

कोल्हापुर: महाराष्ट्रात आतापर्यंत 22 साखर कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. तसेच राज्याच्या अनेक विभागात दुष्काळ आणि पूरामुळे साखर उत्पादनासह रिकवरी वरही परिणाम झाला आहे. पण कोल्हापर विभागातील कारखान्यांनी रिकवरी मध्ये चांगली कामगिरी केली आहे.

साखर आयुक्तालयाच्या अहवाला नुसार 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत कोल्हापुर विभागातील कारखान्यांनी सरासर 12.06 रिकवरीची नोंद केली.
कोल्हापुर जिल्हयात पंचगंगा कारखान्या ने सर्वाधिक 12.73 साखर रिकवरीची नोंद केली आहे. सांगली जिल्ह्यात निनाईदेवी कारखान्याने ने सर्वाधिक 12.87 साखर रिकवरीची नोंद केली आहे.

27 फेबुवारी, 2020 पर्यंत राज्यामध्ये 22 कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. ज्यामध्ये 10 औरंगाबाद, 3 अहमदनगर, 3 सोलापर, 4 पुणे, 1 अमरावती आणि 1 कोल्हापुर. सध्या तरी आतापर्यंत कारखान्यांनी 451.40 लाख टन ऊस गाळप करून 11.02 साखर रिकवरी प्रमाणे 497.45 लाख क्विंटल टन साखरेचे उत्पादन केले आहे. सध्याच्या हंगामा दरम्यान राज्यात 143 कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता.

महाराष्ट्राच्या पश्चिम परिसरात महापूर आणि दुष्काळामुळे ऊस पिकावर परिणाम झाला होता आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी करण्यात आल्यामुळे याचा परिणाम राज्यातील गाळप हंगामावर दिसून येत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here