नांदेड विभागात साखर उतारा १० टक्क्यांपर्यंत

पुणे : महाराष्ट्रातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत, ३ मे २०२१ अखेर १७३ साखर कारखाने बंद झाले आहेत.

नांदेड विभागातील २६ साखर कारखान्यांपैकी २५ कारखाने बंद झाले आहेत. नांदेड विभागात ९४.२८ लाख टन उसाचे गाळप करून ९३.९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. येथील साखर उतारा १० टक्क्यांपर्यंत आहे. सद्यस्थितीत नांदेड विभागाचा साखर उतारा ९.९७ टक्के नोंदविण्यात आला आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३ मे २०२१ अखेर १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १००९.११ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५८.८६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात साखरेचा सरासरी उतारा १०.४९ टक्के आहे.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ४३ तर कोल्हापूर विभागातील ३७ साखर कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागातील २८ कारखाने बंद झाले असून अहमदनगर विभागातील १९, औरंगाबाद विभागातील १७ कारखान्यांचे गाळप समाप्त झाले आहेत. अमरावती आणि नागपूर विभागातील प्रत्येकी २ कारखाने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here