जिल्ह्यात २,२५६ हेक्टरमधील ऊस क्षेत्र घटले

सहारनपूर : जिल्ह्यातील ऊस पिक कमी झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत २,२५६ हेक्टरमधील ऊस पिक लागवड क्षेत्र घटले आहे. गेल्या हंगामात १,२१,५३५.५४४ हेक्टरमध्ये ऊस पिक लागवड करण्यात आली होती. यंदा ते १,१९,२६९.२८६ हेक्टरवर आले आहे. यामुळे साखर कारखान्यांमध्ये ऊस मिळविण्यासाठी स्पर्धाच लागेल. ऊस सर्व्हेचा अहवाल सादर झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात देवबंद साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात लागण ऊस क्षेत्रात १० टक्क्यांची वाढ झाली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गांगनौली साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दोन टक्के ऊस लागवडी जादा झाली आहे. गागलहेडी आणि शेरमऊ या दोन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस पिक कमी झाले आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेले बिडवी आणि टोडरपूर हे साखर कारखाने यंदाच्या गळीत हंगामात सुरू होतील अशी शक्यता आहे. टोडरपूर कारखान्याने गळीत हंगामात चाचणी घेतली आहे. आतापर्यंत सहा कारखाने हंगामात सहभागी होत होते. यामध्ये देवबंद, गांगनौली, गागलहेडी, शेरमऊ, नानौता आणि सरसावाचा समावेश आहे. ऊस लागवड क्षेत्र घटल्याने पुढील हंगामात ऊसासाठी कारखान्यांमध्ये तीव्र स्पर्धा असेल. दरम्यान, आगामी हंगामात बिडवी आणि टोडरपूर साखर कारखाना सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी सुशील कुमार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here