ऊस थकबाकी : साखर कारखाना अधिकाऱ्यांविरोधात आमदारांकडून फिर्याद

लखीमपूर खीरी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसाची बिले न दिल्याने बजाज हिंदुस्थान साखर कारखान्याच्या मालकासह चौघा जणांविरोधात उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यातील गोला पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. भाजपचे आमदार अरविंद गिरी यांनी बजाज साखर कारखान्याचे मालक कुशाग्र बजाज, युनिट हेड ओमपाल सिंह, कारखान्याचे व्यवस्थापक आर. के. मिश्रा, कायदा सल्लागार अवनी कुमार पांडे यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १० नोव्हेंबरपर्यंत उसाचे पैसे दिले जातील असे आश्वासन दिले होते. मात्र, या दिलेल्या ठराविक मुदतीत शेतकऱ्यांना पैसे देण्यात ते असफल ठरले. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत भाजपच्या आमदारांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here