लखनौ : राज्यात कोणत्याही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही आणि लवकरात लवकर ऊस बिले दिली जातील असे आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले. अमरोहा जिल्ह्यात ४३३ कोटी रुपयांच्या विकास योजनेच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ऊस थकबाकीबाबत सूतोवाच केले. कोविड १९ महामारी सुरू झाल्यानंतर देशभरातील साखर कारखाने बंद राहीले. मात्र, तेव्हाच सरकारने राज्यातील सर्व युनिट सुरू ठेवण्याचे निश्चित केले असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, २००७ ते २०१७ या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ९५,००० कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली. २०१७ नंतर जेव्हा आम्ही सत्तेवर आलो, त्यानंतर आतापर्यंत १.४५ लाख कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आली आहे. लोकांनी जबाबदार लोकप्रतिनिधी निवडावेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link