बरेलीत शेतकऱ्यांना दिलासा, चार कारखाने देणार २६१ कोटींची ऊस बिले

बरेली : बरेलीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२०-२१ या गळीत हंगामातील १२५६ कोटी रुपयांच्या ऊस बिलांपैकी ९९५ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे २६१ कोटी रुपये थकीत आहेत. फक्त फरीदापूर येथील साखर कारखान्याने शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस बिले दिली आहेत. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी कारखान्यांना पत्रे पाठवून तातडीने शेतकऱ्यांना उसाचे पैसे द्यावेत असे निर्देश दिले आहेत.

यंदा जिल्ह्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम एप्रिल महिन्यात संपुष्टात आला. जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी यंदा १,८०,४९३ शेतकऱ्यांकडून तीन कोटी ९० लाख क्विंटल ऊसाची खरेदी केली. गेल्यावर्षी फक्त १.७५ लाख शेतकऱ्यांकडून ऊस घेण्यात आला होता. ऊस खरेदीकेल्यानंतर चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देण्याचे निर्देश आहेत. मात्र, साखर कारखान्यांनी अद्याप पैसे दिलेले नाहीत.

बहेडी कारखान्याकडे सर्वाधिक १५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर नवाबगंज कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ६२ कोटी रुपये थकीत आहेत. सेमीखेजा कारखाना शेतकऱ्यांचे ४० कोटी रुपये देणे आहे. मीरगंज कारखाना शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपये देणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चांगले पैसे दिले गेले आहेत. त्यामुळे ऊस बिले देण्यामध्ये बरेली टॉप १०मध्ये सहभागी आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here