१९ ऑक्टोबर रोजी ऊस परिषदेचे आयोजन: माजी खासदार शेट्टी

कोल्हापूर : जयसिंगपूर येथे १९ ऑक्टोबर रोजी ऊस परिषद होणार असल्याची घोषणा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊसाचा दर या ऊस परिषदेत शेट्टी यांच्यावतीने ठरवला जातो. यावर्षी कारखान्यांकडून १५ ऑक्टोबरपासून ऊसाचे गाळप सुरू होणार आहे. केंद्र सरकारकडून ऊसाच्या एफआरपीची घोषणा केली जाते. ऊस परिषदेत शेट्टी यांच्याकडून एफआरपीपेक्षा अधिक दराची मागणी केली जाते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, ऊस परिषदेचे हे २० वे वर्ष आहे. ऊस उत्पादक शेतकरी अनेक अडचणींतून जात आहेत. परिषदेत शेतकऱ्यांकडून उत्पादन खर्चावर आधारित उसाच्या जादा दराची मागणी केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारे उसाची एफआरपी हप्त्याने देण्याचा घाट घालत आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केला. आम्हाला एफआरपी एकरकमी मिळावी अशी अपेक्षा आहे. तरच शेतकऱ्यांना या पैशांचा फायदा होईल. काही प्रमाणात ते कर्जफेड करू शकतात. तसेच त्यांना पुढील हंगामासाठी पैसेही शिल्लक राहू शकतात असे शेट्टी यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here