सोलापूर विभागात ३३ कारखान्यांकडून उसाचे गाळप बंद

पुणे : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्रात कारखान्यांनी मोठ्या संख्येने हंगामात सहभाग घेतला. हंगामात कारखान्यांनी गाळप बंद करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर विभागात सर्वाधिक ३३ साखर कारखान्यांनी कामकाज बंद केले आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२१ अखेर १८७ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. राज्यात ९३९.२८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून ९७९.५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४३ टक्के आहे.

आतापर्यंत राज्यात ६१ साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामध्ये सोलापूर विभागात २३ मार्च २०२१ पर्यंत सर्वाधिक ३३ साखर कारखान्यांनी आपले कामकाज बंद केले आहे. सोलापूर विभागात १७४.११ लाख टन गाळप झाले असून त्यापासून १६२.८९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर विभागात ११ साखर कारखाने, अमरावती आणि औरंगाबाद विभागात प्रत्येकी २, नांदेडमध्ये ८ आणि पुणे विभागात ३ साखर कारखाने आतापर्यंत बंद करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here