साखर कारखान्यात सुरु झाली गाळप हंगामाची तयारी

साखर कारखान्यांकडून 2020-2021 गाळप हंगामाची तयारी जोरात सुरु झाली आहे. कारखान्यांमध्ये मशीनची देखभाल आणि दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. कोरोना च्या वाढत्या प्रकोपादरम्यान कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि तोडणी कामगार यांच्या आरोग्या बाबत कारखाना व्यवस्थापनाकडून सावधानतेची पावले उचलली जात आहेत. गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर मध्ये सुरु होतो.

नवा गाळप हंगाम एक महिन्याच्या आत सुरु होणार आहे, तरीही शेतकर्‍यांची थकबाकी कारखान्यांकडून देय आहे. शेतकर्‍यांनी सांगितलेकी, ऊस थकबाकीमुळे त्यांची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे. साखर कारखान्यांकडून लवकरात लवकर थकबाकी भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. साखर कारखान्यांनी सांगितले की, आर्थिक स्थिती खराब झाल्याने ते ऊसाचे पैसे देण्यात अपयशी ठरले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here