आगामी गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यांनी थकबाकी द्यावी: ऊस शेतकर्‍यांची मागणी

चंदीगढ, पंजाब : आगामी ऊस गाळप हंगाम जवळ आला आहे आणि याची तयारीदेखील जोरात सुरु आहे. पण पंजाब मधील शेतकर्‍यांनी सांगितले की, कारखान्यांनी अजूनही त्यांची थकबाकी भागवलेली नाही.

शेतकर्‍यांनी सांगितले की, आताही 300 करोड रुपयांपेक्षा अधिक देय कारखान्याकडून प्रलंबित आहे. राज्यातील ऊस विभागाकडून मिळालेल्या आकड्यांनुसार, सहकारी साखर कारखाने आणि खाजगी साखर कारखान्यांकडून क्रमश: 127 करोड रुपये आणि 205 करोड रुपये मिळून एकूण 332 करोड रुपये देय आहेत. पंजाबमधील काही साखर कारखान्यांनी निवेदन केले आहे की, ते राज्य कृषी मूल्य 310 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे ऊसाचे पैसे भागवण्यात सक्षम नाहीत. यामुळे ते एफआरपी नुसार थकबाकी भागवणार आहेत. आगामी हंगामासाठी, केंद्र सरकारने 285 रुपये प्रति क्विंटल एफआरपी निश्‍चित केली आहे.
ऊस शेतकर्‍यांनी आगामी गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यांना पैसे देण्यास सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here