पोक्का बोईंग रोगाच्या च्या विळख्यात ऊस, शेतकरी वैतागले

गोरखपूर: प्रदेशातील ऊस शेतकरी वैतागले आहेत. टोळांच्या हल्ल्यानंतर आता ऊस पीक पोक्का बोईंग रोगाच्या विळख्यात आहे. पूर्वांचल येथील गोरखपूर आणि बस्ती मंडलांच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये याचा प्रकोप दिसून येत आहे. देवरिया आणि महराजगंज येथील शेतकरी अधिक अडचणीत आहेत. ऊस विकास विभाग आणि साखर कारखाने याचा सर्वे करुन घेत आहे आणि प्रभावित क्षेत्रफळाचे आकलन करण्यात व्यस्त आहे. कुशीनगर च्या सेवरही येथे स्थित असलेल्या ऊस शोध केंद्राच्या टीमशिवाय ऊस विकास विभाग आणि ऊस विभागाची पथके या रोगाच्या फैलावाचे आकलन करण्यात व्यस्त आहे. येथील शेतकर्‍यांना जवळपास 02 लाख हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊसाची लागवड केली आहे.

एका अंदाजानुसार, या रोगाने ऊसाच्या 80 टक्के पीकाचे नुकसान केले आहे. कृषी वैज्ञानिक डॉ. आदित्य द्वीवेदी यांच्या मतानुसार, पोक्का बोईंग रोगाचा प्रकोप पावसा दरम्यान सर्वाधिक होतो. रोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये पानांवर खालच्या बाजूला जिथे पाने तणांशी जोडली गेली आहे, तिथे सफेद पिवळ्या रंगाचे डाग दिसून येतात. नंतर ते लाल भुर्‍या रंगाचे होतात. या रोगाच्या विळख्यात येवून पाने तिथून सडून गळून पडतात. रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे सर्व पाने एकमेकात अडकून पडतात आणि सडल्यामुळे गळू लागतात. यामुळे पिकाची वाढ थांबते आणि उत्पादनात खूप मोठे नुकसान होते.

ऊस विकास तसेच शेतकरी प्रशिक्षण सस्थान गोरखपूर चे सहायक निदेशक डॉ. ओमप्रकाश गुप्ता यांच्या नुसार रोगाचे लक्षणे दिसल्यावर कॉपर ऑक्सीक्लोराइड 0.2 टक्के मिश्रण म्हणजेच 500 ग्रॅम औषध 200 ली. पाण्यात मिसळून प्रति हेक्टरमध्ये 15 दिवसांच्या अंतरात दोन वेळा फवारणी केल्यास हा रोग नियंत्रणात येतो. याशिवाय बावस्टीन च्या फवारणीमुळेही पीक नियंत्रणात आणले जावू शकते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here