उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त : प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख

लखनऊ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शेतकरी आणि ऊस उत्पादकांना त्रास सहन करावा लागत असल्याची “काहीच कल्पना नाही” असा आरोप उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू यांनी शुक्रवारी केला.

“सत्य हे आहे की आपल्या राज्यातील ऊस शेतकरी नुकसान सहन करून ऊसाच्या किंमतीपेक्षा अधिक खर्च करीत असून, त्याचा मोबदला वेळेवर दिला जात नाही म्हणून तो त्रस्त आहे.” असे लल्लू यांनी निवेदनात म्हटले आहे. कॉंग्रेस नेते म्हणाले की 2014 पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली असून दररोज 35 शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

2014 नंतर देशात व राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. 2014-17 मध्ये ही संख्या 12000 हून अधिक आहे. यूपीए सरकारच्या काळात कृषी विकास दर सरासरी 3.6 टक्के होता तो आता 1.9 टक्के आहे. यूपीए सरकारच्या काळात ग्रामीण उत्पन्न 17.6 टक्के होते, ते आता कमी होऊन 6.6 टक्के झाले आहे, ही चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, कर्जाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी कॉंग्रेसप्रणीत यूपीए सरकारने 72,000 कोटी रुपयांचे कर्ज कर्ज माफ केले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here