साखर कारखान्यांच्या जीएम-डिजीएमना शेतकऱ्यांचा घेराव

बुलंदशहर: अनामिका साखर कारखान्याकडून करोड रुपयांची थकबाकी न मिळाल्याने किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याच्या जीएम आणि डीजीएम ना घेराव घालून सात सूत्रीय मागण्यांचे निवेदन सादर केले . कारखान्याच्या मुख्य गेटवर महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते .जीएमनी थकबाकी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.

यावेळी बोलताना किसान सभेचे प्रदेश संयुक्त सचिव चंद्रपाल सिंह म्हणाले, कारखान्यांवर शेतकऱ्यांचे ५४ करोड रुपये देय आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे .योगी सरकारने निवडणूकीवेळी १५ दिवसात ऊसाची थकबाकी देण्याचे वचन दिले होते. पण ते पूर्ण केले नाही. ऊसाचे क्षेत्र वाढत आहे, पण त्या प्रमाणात कारखान्याची क्षमता वाढत नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस कमी दरात गाळप करावा लागतो. अशा समस्या महापंचायतीने कारखान्यांसमोर मांडल्या.

यानंतर संध्याकाळी चार वाजता जीएम के .पी. सिंह आणि डीजीएम केन यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. या दोघांनी घेराव घालून सभेने जाब विचारला. यानंतर के.पी. सिंह यांनी १ महिन्याच्या आत ४० करोड देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.

यावेळी जगवीर सिंह, नौशाद अली , हिम्मत सिंह, चंद्र प्रताप सिंह, अनूप सिंह, प्रमोद कुमार, सीताराम शर्मा, राजकुमार, हारिस प्रधान, रहीस खां, हरेंद्र सिंह, मूल चंद शर्मा, चंद्र वीर सिंह, वंदन सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here