ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी शंभर टक्के बिले मिळालीच पाहिजेत : माजी खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर : जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या हंगामात त्यांच्या ऊसाची एफआरपी (योग्य आणि लाभदायी दर) एकरकमी दिली गेली नाही, तर साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करू दिला जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (एसएसएस) राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. थकीत एफआरपीच्या रक्कमेबाबत चर्चा करण्यासाठी पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेट्टी यांनी सांगितले की, महाविकास आघाडीने (एमव्हीए) एफआरपी हप्त्यामध्ये करण्यास परवानगी देवून शेतकऱ्यांना धोका दिला आहे. जर सरकारला आपल्या आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या एफआरपीचा निर्णय रद्द करण्यात अपयश आले तर, या वर्षी आम्ही गळीत हंगाम सत्र सुरू करू दिले जाणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, शेट्टी यांनी सांगितले की, साखर कारखान्यांकडे ऊस बिले थकीत आहेत. गेल्या वर्षीचा गळीत हंगाम संपून तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची प्रलंबित एफआरपी मिळालेली नाही. त्यांनी गायकवाड यांना सांगितले की, साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह देण्याचे निर्देश द्यावेत. शेट्टी यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन गायकवाड यांना दिले. यावेळी योगेश पांडे, बापूसाहेब कारंडे, सुरेंद्र पंढरपुरे आणि डॉ. दिनेश लालवानी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here