केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी अपुरी : कर्नाटक राज्य रायत संघ

म्हैसूर : हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र सरकारकडून जाहीर केलेली उसाचा लाभदायी आणि योग्य दर (एफआरपी) अपुरा असल्याचे सांगत कर्नाटक राज्य रायत संघाने (KRRS) निराशा व्यक्त केली आहे. तीन जुलै रोजी म्हैसूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना KRRSचे नेते बडगलापुरा नागेंद्र यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने १०.२५ टक्के उताऱ्याच्या दरासह एक क्विंटल उसासाठी एफआरपी ३०५ रुपयांवरून वाढवून ३१५ रुपये केली आहे. केंद्र सरकारकडून निश्चित केलेली एफआरपी उत्पादन खर्च काढण्यास पुरेशी ठरणारी नाही, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांना एम. एस. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींनुसार, एक क्विंटलसाठी ५८५ रुपये दर मिळण्याची गरज आहे. याशिवाय साखर कारखाने इथेनॉल आणि अन्य उप उत्पादनांसाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी निश्चित केलेले १५० रुपये प्रती टन दर देण्यास अपयशी ठरले आहेत.

बडगलापुरा नागेंद्र यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कठीण आर्थिक परिस्थितीत मदतीसाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या एफआरपीवर राज्य सल्लागार दर (एसएपी) निश्चित करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here