मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन

संगरुर : साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकी देण्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या तोतापुरी रोडवरील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून पंजाब सरकार आणि साखर कारखान्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. संघर्ष समितीचे कार्यकर्ते हरजीत सिंह बुगरा यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना दीर्घकाळ संघर्ष समिती करत आहेत. मात्र, त्याचा ठोस निर्णय घेतला जात नाही. दहा मे रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले गेले. तेव्हा प्रशासनाने प्रत्येक आठवड्याला तीन कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या तीन आठवड्यात केवळ दीड कोटी रुपये मिळाले आहेत.

याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ज्या वेळी भगवंत मान यांनी धुरीमधून आपल्या निवडणुकीचा अर्ज भरला होता, त्यांनी सांगितले होते की, केवळ वीस दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. आणि त्यानंतर व्याजासह पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी केवळ एक दिवस ते मुलोवाल गुरुद्वारा साहिब व शिव मंदिर रणीच्या समोर पोहोचले. त्यानंतर ते दुसऱ्यांदा लोकांना भेटण्यासाठी फिरकलेले नाहीत. शेतकऱ्यांनी सांगितले की, जोपर्यंत साखर कारखाने चौदा कोटी रुपये देत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here