कप्तानगंज : ऊस थकबाकी भागवण्यासाठी पीडब्लूडी डाक बंगल्यामध्ये आमदारांनी डीसीओ आणि साखर कारखान्याच्या एजीएम यांच्याबरोबर बैठक घेतली. त्यांनी या मुदयाला विधानसभेत मांडण्याचा इशारा दिला.
आमदार रामानंद बौद्ध म्हणाले, साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे हंगाम 2019-20 चे 64 करोड़ आणि डिफर मूल्य ६ करोड रुपयांपेक्षा अधिक देय बाकी आहे. डीसीओ वेद प्रकाश सिंह म्हणाले, साखर, मोलॅसिस आणि बगॅस च्या विक्रीमुळे मिळालेल्या रकमेतून 85 टक्के शेतकरी आणि 15 टक्के कारखान्याचा मेंटेनेंस दिला जातो. शेतकऱ्यांचे एकूण 64 करोड़ रुपये देय आहेत, तर साखर कारखान्याकडे सर्व मटेरियल मात्र 34 करोड़ चे आहे. कारखान्याला 30 करोड़ रुपये ची व्यवस्था करायला हवी. ऊस थकबाकी भागवणसाठी कारखान्याला दहा पेक्षा अधिक नोटीस देण्यात आल्या आहेत.

एजीएम विनोद कुमार श्रीवास्तव म्हणाले, अतिरिक्त 30 करोड़ रुपयांची व्यवस्था करणे लगेच शक्य नाही. बैठकीमध्ये परमजीत सिंह, दीनानाथ शुक्ला, डबलू मिश्रा, चंद्रशेखर सिंह आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.