साखर कारखाना बंद होणार नाही या आश्वासनानंतर गोव्यात ऊस उत्पादन कायम

पोंडा, गोवा: अलीकडेच कृषी मंत्री चंद्रकांत कावलेकर यांच्या कडून ऊस शेतकर्‍यांबरोबर आयोजित बैठक़ीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहिर केले होते की, गोव्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना बंद होणार नाही. त्यांनी हे देखील सांगितले की, कारखान्याला आधुनिक बनवण्यात किंवा नवे संयंत्र स्थापित करण्यात दोन वर्षे लागतील. दोन वर्षांच्या आत संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याच्या राज्य सरकारच्या आश्‍वासनानंतर शेतकर्‍यांनी पुढच्या दोन वर्षांपर्यंत ऊसाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक संघ गोव्याचे उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई यांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रतिक्रियेवर संतुष्ट आहेत. त्यांनी सांगितले की, काही महिन्यापूर्वी, राज्य सरकार शेतकर्‍यांना पीक बदलण्यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते.

47 वर्षांपूर्वीचा हा जुना साखर कारखाना जिर्ण अवस्थेत आहे आणि कारखान्याच्या पूर्ण प्लांटचे आधुनिकिकरण करणे गरजेचे आहे. सरकारकडून 2017 मध्ये कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 29.3 करोड रुपये मूल्याच्या एका परियोजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारला प्रस्तुत करण्यात आला होता. केंद्र सरकार ने हा प्रस्ताव फेटाळून सांगितले की, ही योजना कृषी प्लांटसाठी आहे आणि संजीवनी कारखाना सहकार विभागाकडून चालवला जातो. मंत्री कावलेकर यांनी सांगितले की, राज्य सरकारने अलीकडेच कारखान्याला सहकार विभागाकडून कृषी विभागाकडे सुपुर्द केले आहे. आणि सरकार आता या प्रस्तावाला पुन्हा केंद्र सरकारकडे घेवून जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here