लॉकडाऊन मुळे मजूर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी वाढवले ऊस लागणीचे क्षेत्रफळ

मोतिगरपुर (सुलतानपुर) : पहायला गेल तर जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणात होते. पण गेल्या काही वर्षांपासून मजुरांच्या कमीमुळे शेतकऱ्यांनी क्षेत्रफळ कमी केले होते, पण यावेळी लॉकडाउन मुळे घरी परत आलेल्या प्रवासी श्रमिकांमुळे शेतात काम करणाऱ्यांची संख्या वाढल्याने क्षेत्रफळ ही वाढवण्यात आले. साखर कारखाना चालला नाही तरी सुध्दा गुळ बनवून त्याची विक्री केली जाऊ शकते, असा शेतकऱ्यांचा मानस आहे.

ऊस शेतीसाठी अधिक लोकांची गरज असते. लागवडीपासून ऊस तोडणी वगैरे कामासाठी जितके अधिक मजूर तितकी कामात सहजता येते. विकास खंडाच्या गोरसरा गावातील शेतकरी शिवचरण शर्मा प्रत्येक वर्षी दोन एकरात ऊस लागवड करत होते, पूर्वी ते स्वतः आपल्या एका मुलाबरोबर काम करत होता. यावेळी परराज्यातून दूसरा मुलगा आपल्या कुटुंबासह आल्यानंतर त्यानि शेती क्षेत्रफळ चार एकर पर्यंत वाढवले आहे. याप्रमाणे भैरोपुर गावातील शेतकरी म्हणाले की, गावात मजूर नसल्याने अडचण येत होती, पण आता लागवडीवेळी गावात प्रवासी मजूर आल्याने गावातच मजुर मिळाले आहेत. त्यामुळे क्षेत्रफळ वाढवले आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, साखर कारखान्यात पावतीची समस्या झाली तर यावेळी गूळ तयार करुन विकला जाईल. यामध्ये फायदाही पूर्ण होईल.

जिल्हा ऊस अधिकारी सुनील कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षी 54800 हेक्टेर लागवड झाली होती. यावेळी 2 टक्के इतकी वृद्धी झाली आहे. जुलैमध्ये क्षेत्रफळ अजून वाढण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here