शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे साखर कारखान्याची अचानक तपासणी

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

बिजनौर (उत्तर प्रदेश) :

जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी बुधवारी स्योहारा साखर कारखान्याच्या काट्याची अचानक तपासणी केली. यात काट्यामध्ये कोणतिही त्रुटी आढळली नसल्याचे सांगण्यात आले.

काटा तपासणीनंतर यशपाल सिंह यांनी धामपूर साखर कारखान्याच्या ऊस क्षेत्रालाही भेट दिली आणि उसाचे चांगले पिक आल्याबद्दल सामाधानही व्यक्त केले. धामपूर कारखान्याने ट्रेंच पद्धतीने उसाची पेरणी केली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी भेट देण्यात आली होती, असे यशपालसिंह यांनी सांगितले. यापद्धतीने आलेल्या उसाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. यशपाल सिंह यांच्यासोबत धामपूर साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक आझाद सिंहदेखील उपस्थित होते. त्यांनी यशपाल सिंह यांना ऊस क्षेत्राची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here