ऊस प्रश्न : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा २५ नोव्हेंबर रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा निर्णय

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (SSS) राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत राज्य सरकारच्या उदासिन भूमिकेविरोधात २५ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी चक्का जाम (वाहनांचे दळणवळण रोखणे) ची घोषणा केली आहे. यावेळी राज्यातील मंत्र्यांनाही जाब विचारला जाईल असे ते म्हणाले.

शेट्टी म्हणाले की, राज्य सरकार आमच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय घेण्यास अपयशी ठरले आहे. यामध्ये दोन हप्त्यात एफआरपी (FRP) रद्द करणे, यावर्षी उसाची एफआरपी अधिक ३५० रुपये देणे या मागण्यांसाठी आंदोलन सुरू ठेवले जाईल.

ते म्हणाले की, आम्ही पुण्यात साखर संचालनालयावर मोर्चा काढला आणि दोन दिवसांसाठी ऊस तोडी बंद पाडल्या. तरीही राज्य सरकारने मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शेट्टी यांनी सरकारच्या या उदासिन भूमिकेबाबत सांगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ नोव्हेंबर रोजी चक्का जाम करून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्गांवर सर्व वाहनांचे दळणवळण बंद पाडले जाईल आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांना जाब विचारला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here