स्वाभिमानी शेतकरी संंघटनेंने केली एकरकमी एफआरपी ची मागणी

कोल्हापूर: परिसरातील विविध शेतकरी संघटनांसोबत झालेल्या बैठकीमध्ये साखर कारखानादारांनी उसासाठी एकरकमी एफआरपी देण्याबाबत चर्चा केली. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शेतकरी संघटना आणि साखर कारखानादारांची बैठक बोलावली होती. मंत्री पाटील यांनी सांगितले की, शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांनी या हंगामासाठी निश्‍चित एफआरपी च्या आधारावर शेतकर्‍यांना पैसे देण्याबाबत सहमती दर्शवली. त्यांनी सांगितले की, आता मला आशा आहे की, शेतकर्‍यांकडून कोणतेही हिंसक आंदोलन केले जाणार नाही आणि उस गाळप कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडेल. मंत्री पाटील म्हणाले, अनेक शेतकर्‍यांचे मोेठ्या पावसामुळे पीकाचे नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी कृषी विभागाला शेतांचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे, जेणेकरुन गाळप लवकरात लवकर होईल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जलंदर पाटील यांनी सांगितले की, आम्ही एफआरपी दरांनुसार शेतकर्‍यांना पैसे देण्याच्या कारखानदारांच्या निर्णयाचे स्वागत करतो. पैसे एक रकमीच भागवले जावेत. उस श्रमिकांसाठी उसतोडणी शुल्कात जी वाढ झाली आहे, ते पैसेही कारखान्यांकडून देण्यात यावेत आणि शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पैशामध्ये कपात केली जावू नये.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here