स्वराज्य कारखान्याने शेतकऱ्यांना दिले एफआरपीपेक्षा अधिक पैसे

सातारा : प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, स्वराज्य इंडिया अॅग्रो लिमिटेडला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक पैसे देण्यात आले आहेत. सध्याच्या प्रचलीत पद्धतीनुसार साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून एकाच वेळी साखर विक्रीची परवानगी देण्यात येत नाही. टप्प्याटप्प्याने साखर विक्रीची परवानगी मिळते. त्यामुळे साखर विक्रीसाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागतो.

स्वराज्य इंडिया अॅग्रो लिमिटेडने साखर विक्रीनंतर शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले आहेत. ३१ ऑगस्ट अखेर ९९ टक्के ऊस बिले एफआरपीनुसार देण्यात आली आहेत. १६ सप्टेंबरपर्यंत १०० टक्के शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करण्यात आली.
स्वराज्य इंडिया अॅग्रो लिमिटेडच्या कारखाना प्रशासनाने सांगितले की, कोणीतरी साखर आयुक्त कार्यालयाला चुकीची माहिती देऊन शेतकरी आणि ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सर्व वस्तूस्थिती साखर आयुक्त कार्यालयाला कळवली जाईल असे कारखाना प्रशासनाने सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here