उसाची SAP आणि बिले देण्याबाबत योग्य कार्यवाही करा : रालोदचे मुख्यमंत्री योगींना पत्र

लखनौ : राष्ट्रीय लोक दलाचे (रालोद) अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य जयंत चौधरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून राज्य सरकारकडे २०२२-२३ या साठी ऊसाचा लाभदायी राज्य सल्लागार दर (एसएपी) जाहीर करण्याची मागणी केली आहे. रालोद प्रमुख चौधरी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून १४ दिवसांच्या आत पैसे मिळावेत, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. रालोदचे प्रवक्ते अनिल दुबे यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या प्रमुखांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, सध्याच्या गळीत हंगामाचा निम्मा कालावधी समाप्त झाला आहे. आणि तरीही सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही उसाच्या दराची अद्याप घोषणा केलेली नाही.

चौधरी यांनी पत्रात म्हटले आहे की, दराची माहिती नसताना साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ते म्हणाले की, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पुढील विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून SAP जाहीर करण्यात आली होती. रालोदने उत्पादकांना ऊसाचा लाभदायी दर मिळवून देण्यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रे लिहिली आहेत. मात्र, आतापर्यंत याचा काहीच फायदा झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here