तामिळनाडू: उस मूल्यामध्ये वाढ करण्याची मागणी

मदुराई : तामिळनाडू शुगरकेन ग्रोवर्स असोसिएशनशी जोडलेल्या शेतकर्‍यांनी शनिवारी येथील कलेक्ट्रेट च्या बाहेर निदर्शने केली. दरम्यान त्यानीं केंद्र आणि राज्य सरकारला रिकवरी दर 9.5 टक्क्यासह ऊसाची एफआरपी वाढवण्याचा आग्रह केला. केंद्र सरकारने 2020-21 साठी 10 टक्के रिकवरी दरासाठी एफआरपी वाढवून 2,850 प्रति टन करण्यात आली आहे.

पलानीचामी यांनी सांगितले की, तामिळनाडू च्या अधिकांश उसाच्या शेतीची रिकवरी जवळपास 9.5 टक्के आहे. यासाठी शेतकरी केवळ 2,707.50 रुपये प्रति टनाप्रमाणे एफआरपी अर्जित करतील. कोविड 19 महामारीमुळे, उस शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासाठी, सरकारला एफआरपी मध्ये चांगल वाढ करावी लागेल. निदर्शने करणार्‍यांनी तक्रार केली की, राज्य सरकारने शेतकर्‍यांची थकबाकी भागवली नाही. त्यांनी सरकारला आग्रह केला की, साखर कारखान्यांद्वारा शेतकर्‍यांना उर्वरीत थकबाकी भागवली जावी.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here