तमीळनाडू: साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी

मदुराई : तामिळनाडू ऊस उत्पादक शेतकरी संघाने अलंगनल्लूर येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. शेतकरी संघटनेने मदुरई येथे आयोजित एका परिषदेत कारखान्याचे गाळप लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. परिषदेचे उद्घाटन करणाऱ्या खासदार सु व्यंकटेश यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हा मुद्दा त्वरीत लक्षात घ्यावा आणि याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.

खासदार व्यंकटेश म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी मदुराई जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. यासोबतच राज्य सरकारने कारखाना पु्न्हा सुरू व्हावा यासाठी दहा कोटी रुपयांचे कर्जही दिले पाहिजे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत नाही असे सांगत खासदार सु व्यंकटेशन यांनी कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. नवी दिल्लीच्या अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष विजू कृष्णन यांनी राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार केला पाहिजे असे सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here