तामिळनाडू: प्रती टन ५,००० रुपये ऊस दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी

तिरुची : तंजावर येथील शेतकऱ्यांनी उसाला प्रती टन ५,००० रुपये दर मिळावा या मागणीसाठी गुरुवारी आंदोलन केले. तंजावर येथील मुख्य टपाल कार्यालयासमोर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की उसाला प्रती टन ५००० रुपये दर मिळण्याची गरज आहे.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या तमिळनाडू विवासयिगल संगमचे राज्य महासचिव सामी नटराजन यांनी सांगितले की, इंधन आणि खतांच्या किमती आता दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे उसाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. ऊस तोडणीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र, पिकाचा दर फार वाढवण्यात आलेला नाही.

उसाच्या उच्च उत्पादन खर्चामुळे ५००० रुपये दर दिला गेला पाहिजे यावर नटराजन यांनी भर दिला. ते म्हणाले की, जर असे झाले नाही तर शेतकऱ्यांचे गंभीर आर्थिक नुकसान होईल. त्यांनी थिरु अरुरन साखर कारखाना लिमिटेडकडून थकित असलेल्या ऊस बिलांचा मुद्दा मांडला. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अरिग्नार अन्ना साखर कारखान्यासह विविध संघाशी संबंधित शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here