तामिळनाड: ऊस शेतकर्‍यांचे तेनकाशी मद्ये अनिश्‍चितकाळासाठी धरणे आंदोलन सुरु

तेनकाशी: 100 पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी गुरुवारी कलेक्ट्रेट समोर अनिश्‍चितकाळासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला तीन खाजगी कारखान्यांकडून त्यांचे 45 करोड रुपये थकबाकी वसुल करण्याच्या दृष्टीने मदत करण्याचा आग्रहर केला आहे. या शेतकर्‍यांनी ऑक्टोबर मध्ये या मागण्यांबाबत दोन दिवसीय धरणे आंदोलन केले होते, तेव्हा तत्कालीन कलेक्टर जी.के. अरुण सुंदर थ्यालन यांनी 25 ऑक्टोबरपर्यंत त्यांचे प्रलंबित पैसे मिळतील असे अश्‍वासन दिले होते.

तामिळनाडू उस शेतकरी संघाचे राज्य उपाध्यक्ष ए.एम. पलानीस्वामी यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये 42 सरकारी आणि खाजगी उस कारखान्यांपैकी 39 कारखान्यांनी शेतकर्‍यांचे पैसे दिलेले आहेत. वासुदेवनल्लूर स्थित तीन कारखान्यांनी आतापर्यंत 24 करोड रुपयांचे देय भागवलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here