तामिळनाडू: साखर कारखाना 30 सप्टेंबर पर्यंत ऊस थकबाकी भागवण्यास सहमत

तामिळनाडू : तामिळनाडू ऊस शेतकरी संघाने सांगितले की, अप्पाकुदल मध्ये खासगी कारखान्याने 30 सप्टेंबर पर्यंत शेतकर्‍यांना 64 करोड रुपयांची थकबाकी तीन टप्प्यात भागवण्यास सहमती दिली आहे. जिल्हा सचिव एएम मुनुसामी यांनी सांगितले की, ऊस नियंत्रण आदेश 1966 नुसार, ऊस प्राप्त झाल्याच्या 14 दिवसांच्या आत शेतकर्‍यांना त्यांचे पैसे दिले जावेत. लॉकडाउन मुळे अडचणीत असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून थकबाकी देण्यात आली नव्हती. ज्यामुळे आम्हाला कारखान्यासमोर अनिश्‍चित काळासाठी विरोध सुरु करावा लागला .

एक त्रिपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये गोबीचट्टिपलायम महसूल विभागीय अधिकारी जयरामन, तहसीलदार पेरियासामी, कृषी अधिकारी, पोलिस उप अधीक्षक कार्तिकेयन, कंपनी व्यवस्थापक अणि असोसिएशन चे सदस्य सहभागी झाले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here