कोइंबतूर : सुब्रमण्य शिव सहकारी साखर कारखान्यात कृषीमंत्री एम. आर. के. पनीरसेल्वम यांच्या हस्ते गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. सुब्रमण्य शिव साखर कारखान्याच्या क्षेत्रात ७,२१५ एकर क्षेत्रात लागवड केलेल्या २.४ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना प्रती टन २,९२९ रुपये ऊस दर देण्यात येणार आहे.
साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊस पुरवठा करणाऱ्या १,५३८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन स्वरुपात दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. कारखाना प्रशासनाने पुढील वर्षी १४,००० एकर क्षेत्रात ४.३ लाख टन ऊस शेती करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.