तामिलनाडू: थकबाकी न भागवल्याने उस शेतकरी वळत आहेत दुसर्‍या पीकाकडे

तंजावुर, तामिळनाडू: जिल्ह्यातील उस शेतकर्‍यांनी साखर कारखान्याला 27 करोड रुपये थकबाकी भागवण्याचे अपील केले आहे, जीे 2016 पासून प्रलंबित आहे. थकबाकीच्या भागवण्याच्या मागणीबाबत त्यांनी कलेक्ट्रेट च्या समोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील कुरुंकुलम, ओरथानडू, वल्लम, थिरुक्कट्टुपल्ली सह अनेक क्षेत्रांमध्ये हजारो उस शेतकर्‍यांनी 14,000 एकरामध्ये उसाची शेती केली होती.

शेतकर्‍यांनी आरोप केला आहे की, कारखाना अधिकार्‍यांनी 2015-16 हंगामातील थकबाकी अजूनही भागवलेली नाही. तंजावुर जिल्ह्यामध्ये शेतकरी साधारणपणे हजारो एकरमध्ये उसाची शेती करतात. कारखान्यांकडून थकबाकी न भागवल्याने, उस शेतकरी आता हळू हळू तांदळाच्या पीकाकडे वळत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here