तामिळनाडू : वेल्लोर साखर कारखान्यात ३ लाख टन उसाचे गाळप करण्याची योजना

वेल्लोर, तामिळनाडू : वेल्लोर सहकारी साखर कारखान्यात यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीसह विविध प्रकारची देखभालीची कामे जोरात सुरू आहेत.

कारखान्याचे अध्यक्ष एम. आनंदन यांनी डीटी नेक्स्टला सांगितले की, आगामी हंगामात गाळपासाठी कारखान्याने आधीच २.२५ लाख टन उसाची नोंदणी केली आहे. मागील हंगामातील उपलब्ध उसापेक्षा हे प्रमाण ४०,००० टन अधिक होते. उसाची नोंदणी अजूनही सुरू आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की या हंगामात नोव्हेंबरपर्यंत सुमारे ३ लाख टन नोंदणी होईल. कारण आम्हाला शेजारील युनिट्सकडूनही ऊस उपलब्ध होईल. मात्र, कारखान्यातील दुरुस्तीच्या समस्या अद्यापही कायम आहेत.

आनंदन म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी वेल्लोर युनिटमध्ये कन्व्हेअर बेल्टला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्ती केली जात आहे. येत्या हंगामात सरासरी १० टक्के उतारा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here