ऊस थकबाकी भागवण्यासाठी कारखान्यांना पुढच्या आठवड्यापर्यंतची मुदत

बिजनौर : डीएम यांनी ऊस थकबाकी असणाऱ्या बिजनौर आणि चांदपूर कारखान्यांतील अधिकार्‍यांना फटकारले. त्यांनी ऊस थकबाकी भागवण्यासाठी कारखान्यांना पुढच्या आठवड्यापर्यंतची मुदत दिली आहे. कारखान्यांनी ऊसाचे शंभर टक्के पैसे पुढच्या आठवड्यात भागवण्याचे निर्देश दिले आहेत.

डीएम रमाकांत पांडये यांनी ऊस थकबाकीवर कडक कारवाई करताना प्रत्येक आठडयाला अधिकार्‍यांची बैठक घेणे सुरु केले आहे. आता प्रत्येक आठवड्या साठी ऊस थकबाकी भागवण्याचे टार्गेट दिले जाईल. डीएम यांना शनिवारी घेतलेल्या बैठकीत आढळून आले की, चांदपूर साखर कारखान्याने वाटप करण्यात आलेल्या टार्गेटपेक्षा 50 लाख व बिजनौर कारखान्याने जवळपास सव्वा करोड रुपये कमी भागवले आहेत. त्यांनी दोन्ही कारखान्यांच्या अधिकार्‍यांना कडक शद्बात फटकारले. गेल्या आठवड्यात कारखान्यांना एकूण 97 करोड थकबाकी भागवण्याचे टार्गेट दिले गेले, त्या सापेक्ष कारखान्यांनी 117 करोड रुपये थकबाकी भागवली. डीएम यांनी पुढच्या आठवड्यात स्योहारा साखर कारखान्याला 15 करोड, बिलाई, बरकातपूर आणि धामपूर साखर कारखान्याला दहा दहा करोड व बाकी साखर कारखान्यांना पाच पाच करोड रुपये भागवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान जिल्हा ऊस अधिकार्‍यांसह सर्व साखर कारखान्यांचे अधिकारी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here