गुयानाच्या साखर कारखान्यांना भारताकडून तांत्रिक सहकार्य

जॉर्जटाउन: कृषी मंत्री जुल्फिकार मुस्तफा यांनी सांगितले की, कृषी मंत्रालय साखर कारखान्यांना पुन्हा सुरु करण्याच्या दिशेने पुढे येत आहे. भारताचा सल्ला आणि सहकार्य कारखान्यांच्या तांत्रिक कर्मचार्‍यांसाठी फायदेशीर होईल. यामुळे कारखान्यांबरोबर ऊस शेतीच्या विकासासाठी ही खूपच मदत मिळेल. मंत्री जुल्फिकार मुस्तफा यांनी सांगितले की, मला आशा आहे की, आम्हाला तांत्रिक कर्मचार्‍यांच्या बाबतीत भारताकडून चांगली मदत मिळेल.

त्यांनी सांगितले की, भारताच्या उच्चायुक्तांना मी पत्र पाठवून तांत्रिक तज्ञांची मागणी केली आहे, जे इथे येवून आम्हाला सहकार्य करतील. गुयानामध्ये ऊस आणि साखर उद्योगाच्या विकासासाठी स्थानिक सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, ज्यामुळे साखर उत्पादनात वाढीबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण होण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here