साखर कारखान्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी तेलंगणाचे शेतकरी महाराष्ट्राकडे रवाना

वानापर्थी : जिल्ह्यातील ७० हून अधिक शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्रातील बारामतीकडे रवाना झाले आहे. साखर कारखान्यांसह शेतकरी सहकारी समित्यांच्या कामकाजाचा अभ्यास हे शिष्टमंडळ करणार आहे.
बागायती शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश या अभ्यास दौऱ्यामागे आहे आणि शेतकरी सहकारी समित्यांच्याबाबत त्यांच्यामध्ये जागरुकता आणण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील बारामतीमध्ये अनेक शेतकरी सहकारी समित्या यशस्वीपणे काम करीत आहेत. प्रत्येक सहकारी समितीशी जवळपास १०,००० ते २५,००० शेतकरी जोडले गेले आहेत. आपल्या अभ्यास दौऱ्यामध्ये वानापर्थीचे शेतकरी शेती, उत्पादन, वितरण, साखर कारखान्यांचे व्यवस्थापन आणि इतर पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. जिल्हा रायथू बंधू समितीचे अध्यक्ष जगदीश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी बसला येथे हिरवा झेंडा दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here