तेलंगाना: 18 नोव्हेंबर पर्यंत थकबाकी भागवण्याचे मंत्र्यांनी दिले आदेश

संगारेड्डी, तेलंगाना: वित्त मंत्री टी हरीश राव यांनी जिल्हा अधिकार्‍यांना निर्देश दिले होते की, ते ट्राइडेंट शुगर इंडस्ट्रिजच्या व्यवस्थापनाविरोधात कारवाई करावी, जेणेकरुन कारखाना शेतकर्‍यांना त्यांचे पैसे भागवू शकेल. मंत्री राव यांनी ट्रायडेंट कारखान्याला 18 नोव्हेंबर पर्यंत थकबाकी भागवण्यासाठी मुदत दिली आहे. हैद्राबाद मध्ये कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींबरोबर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मंत्र्यांनी फर्मला 18 नोव्हेंबरपर्यंत 1,400 उस शेतकर्‍यांना 12.70 करोड थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले.

त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. जर त्यांनी वेळेत पैसे दिले नाहीत तर, त्यांच्याविरोंधात राजस्व वसूली अधिनियम च्या अंतर्गत कारवाई केली जाईल. मंत्री राव म्हणाले की, टीआरएस सरकार नेहमी उद्योगांना अनुकूल वातावरण प्रदान करते, सरकार कोणत्याही कंपनी व्यवस्थापनाला फर्म च्या कुशल संचालनासाठी लघु आणि दीर्घकालीक निति तयार करण्यासाठी सांगितले. त्यांनी ट्राइडेंट शुगर इंडस्ट्रिज ला हे देखील सांगितले की, जर इंडस्ट्रिज ला कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार कंपनीची मदत करण्यासाठी तयार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here