शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यासाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम

महराजगंज : शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. उज्ज्वल कुमार यांनी आयपीएल सिसवा बाजार
कारखान्याचे प्रशासक, जेएचबी गडौरा, कप्तानगंज आणि पिपराईच यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेतला. उसाचे पैसे त्वरीत न दिल्यास कारखाना प्रशासनावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दहा दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा अल्टिमेटम देण्यात आला. अन्यथा कारखान्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी जेएचबी गडौरा कारखान्याकडे शेतकऱ्यांचे २०१७-१८ या वर्षातील १९१.७५ लाख रुपये थकीत असल्याचे दिसून आले. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली. यावर जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव यांना नजर ठेवण्यास सांगण्यात आले. पैसे दिले गेले नाहीत तर एफआयआर दाखल करावा. यंदाच्या हंगामात ऊसाचा दर चांगला मिळालेला नाही, शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत याबाबत विचारणा करण्यात आली.

सिसवा बाजार कारखान्याने यंदा ८५ टक्के तर पिपराईच कारखान्याने ८२ टक्के पैसे दिले आहेत असे दिसले. मात्र, कप्तानगंज कारखान्याकडून फक्त ४० टक्के पैसे दिले गेले आहेत. यावर नाराजी व्यक्त करीत कप्तानगंजसह सर्व कारखानदारांना अल्टीमेटम देण्यात आला. लवकरात लवकर पैसे द्यावेत अशी सूचना करण्यात आली.
या आढावा बैठकीला जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव, सिसवा बाजारचे कर्मवीर सिंह, पिपराईचे सीताराम भारद्वाज, कप्तानगंजचे अखिलेश सिंह, जेएचबी गड़ौराचे दीनदयाल पांडेय उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here